
मुंबई, दि.29 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
दुखवट्याच्या घोषणेनंतर राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी असेल का याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र राज्य सरकार तसेच शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शाळांना सुट्टी केवळ 28 जानेवारी रोजीच देण्यात आली होती.
29 आणि 30 जानेवारी रोजी राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहेत. याबाबत कोणताही अतिरिक्त सुट्टीचा आदेश शासनाने दिलेला नाही, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात 28 ते 30 जानेवारी दरम्यान दुखवटा पाळण्यात येणार असून, या काळात शासकीय मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत आणि काही शासकीय नियम लागू राहतील.
काही वृत्तांनुसारही स्पष्ट करण्यात आले आहे की, 28 जानेवारी रोजी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या; मात्र त्यानंतर शाळा नियमित सुरू राहतील.