
पुणे दि. 29 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पार्थिवावर २९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधीवेळी त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कार सोहळ्याला राज्य व केंद्रातील अनेक मान्यवर नेते तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.अजित पवार यांचे निधन २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात झाले. या दुर्घटनेत विमानातील इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून राज्यभर शोककळा पसरली आहे.अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.